Tuesday, June 28, 2011

मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही....

तुला काय वाटल,
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप मिस करतो!!...

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!

फक्त तुला भेटण्यासाठी.........
मी सुदधा खिडकिच्या गजातुन पाउस बघत असते..
"कसा आहे तो सांग ना रे"अस सारख त्याला विचारत असते.

तुझ्या सोबत धुन्द भिजलेल्या छळतात त्या सार्‍या आठवणी.
तु नाहिस आता सोबत हि जाणीव व्यापुन उरते मनी..

पहिल्याच भेटीचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो.
चेहरा तुझ मग तासन तास विचारत तरळ्तो.

वास्तवाच कडेलोटाच भान आल कि खुप त्रास होतो..
पण तरीही हे सगळ मी निमुटपणे सहन करते..

कारण त्याच्या सोबत तु ही बरसत आहेस अस समजुन..
मी नेहमीच मनोमनी ह्या पावसात भिजत असते..

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!

फक्त ती सुखात राहायला हवी......!!!!

त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?

मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला

अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला

थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला

अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी......!!!!

तू माझा माझ्यासाठी राहू दे....!

आठवण तुझी येतच नव्हती
कारण तू येणारच होतास, माझ्यासाठी
आठवण तुझी येतच होती
कारण तू येणार होतास, जाण्यासाठी

का असा छळतोस मला?
हवे असताना तू, टाळतोस मला?
भेट तुझी-माझी होणारच आहे
कारण मी 'तुझ्यासाठी' येणारच आहे

कळत कसे नाही तुला?
तुझ्या शिवाय अर्थ नाही मला....
स्पर्श तुझा जाणवत राहतो
कळतच नाही कि, तो भास असतो

कसली हि आतुरता? कशासाठी आसुसलेपणा?
असतोस तू जवळ, तरीही अधुरेपणा....
घटत काळोखात मिटून जावसं वाटतं
तुझ्या मिठीत भरून राहावंस वाटतं

भुकेले ओठ, तहानलेली नजर,
आता थोडी तरी किव कर
हे सगळं तुला कवितेतलं वाटतंय?
पण कधीपासून असं मनात सलतंय

पापण्या मिटल्यावर तूच असतोस
उघडल्यावर, पापण्या संगे वेडी आस असते
येशील? दूर? जिथे हे सगळं संपणार असेल?
असा अंत खरंच आपल्याला मिळेल?

बोलना, काहीतरी बोल! खोल-खोल!
का तुझे डोळे, नि माझ्या भावना अबोल?
भावनांना डोळ्यांतून वाटा करून दे,
तू माझा माझ्यासाठी राहू दे....!

तू माझा माझ्यासाठी राहू दे....!

Friday, June 24, 2011

तुझी सोबत...

हातातुन सरकत जाणार्‍या
वाळुच्या कणासारखी
एकेक वर्ष निसटुन जातात...!
खेळाचं राज्य प्रत्येकावर येतं ...
या डावात आपण शोधत बसतो
एखादी वळीवसर आठवण
वाळुचे खोपे...
पुस्तकातली सुकलेली फुले
मोरपीशी सांज,
गंधमाखली रातराणी
आणि तुझी सोबत....
ए, आपण वाळुचा खोपा पुन्हा बांधायचा?

मु.पो. तेर्से बांबार्डे..

मु.पो. तेर्से बांबार्डे, तालुका - कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग... म्हणजेच कोकणात असलेला एक गाव.. माझाच गाव ता... स्मित गेली पाच वर्ष जाउक जमणा नाय.. तसा माका तर गणपतीतच कोकणात जाउक आवडता.. पण म्हटला उन्हाळ्यातच जाउन येउ.. तसापण शालेय शिक्षणानंतर उन्हाळ्यात कधीच गावी गेलो नव्हतो.. म्हणान जमात तसा फक्त तीन दिवसाचो मुक्काम करुन इलय.. या भेटीत हातात डिजीकॅम असल्याने जास्तच उत्सुकता स्मित
मुंबईत्सून गावाकडे जाताना एकदा गोवा गाडीत बसला की मगे कधी मुंबईच्या बाहेर पडतोय असा असा वाटीत रवता.. रस्त्यात लागणारे वळणावळणाचे घाटरस्ते, नद्या, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी कौलारु घरे, आंबा-फणस-काजी यांनी बहरलेली झाडे इ... सगळा चित्र कसा मस्त डोळ्यासमोर येता नि कधी एकदाचो गावी पोचतय म्हणान मन कासावीस होउन जातय..
एकदा घरी पोचलय की मगे न्हाणीघरातल्या गरम पाण्याने फ्रेश होउन लगेच स्वयंपाक घरात मांडी घालून पाटावर बसूचा नि समोर ताटातल्या 'उकड्या तांदळाची पेज नि वालीच्या गराची उसळ' खाण्यासाठी रेडी !! नि ढेकर इलो की मगे भटकंतीसाठी बाहेर पडूचा!! फिदीफिदी त्यातलेच काही निवडक प्रची..
प्रचि १

(न्हाणीघर ... आता घरोघरी संडास बाथरुम बांधलेले आसत.. पण पाणी गरम करुक काळवंडलेलो माठ व्हयोच )
प्रचि २

(उन्हाळ्यात ह्या हमखास दिसणारा ह्या दृश्य.. सुकी लाकडा, शेणी नि कुडी.. नि मागे घर दिसताहा ता आमचा "मांगर" - पावसात या घरातच शेतकामे उरकली जातात.. जा मी अजून कधी बघूक नाय..)
प्रचि३

(शेणाने सारवलेला आंगण नि मध्ये असणारी तुळस )
प्रचि ४

(सुप्रभात.. थोडासा उजाडला की ह्यांच्या कामांका सुरवात.. )
प्रचि ५

(आमच्या घराजवळच गर्द झाडीत असणारी देवळी.. माझा आवडता ठिकाण.. इथेच मगे दुपारी वार्‍याने होणारी पानांची सळसळ नि पक्ष्यांची नॉन स्टॉप सुरु असणारी किलबिल ऐकत एक डुलकी घेतोच..)
प्रचि ६

(शेतातून जाणारी पाऊलवाट.. खरे तर पावसात इला की दोन्ही बाजूस भातशेतीचे पांघरलेले हिरवे गालीचे दिसतले..)
प्रचि ७

(भाटीयेवरची नारळांची बाग)
प्रचि ८

(नि तिकडेच असणारे वालीच्या शेंगांचे मळे.. इथे पण पावसानंतर सगळे कसे हिरवे हिरवे..)
प्रचि ९

(कुडी..)
प्रचि १०

(मायबोलीवरील भाऊंनी आपल्या डिजीटल चित्रातून "साकव" ची ओळख करून दिली आहेच.. हाच तो साकव.. )
प्रचि ११

(ह्या साकवावरून पावसात चालताना जपूनच.. नायतर व्हाळात पडलोच समजूचा..)
प्रचि १२

(आंबा,फणस इ. झाडे वगळता बहुसंख्याने आढळणारे ऐनाचे झाड.. .)
प्रचि १३

(काळ्या ढगांमुळे सुर्यदेवांनी केलेले वेषांतर.. स्मित )
प्रचि १४

(कोंड- नदीच्या खोलगट भागात टिकून रवलेला पाणी..)
प्रचि १५

(गुरांका पण अंघोळ व्हयीच..)
प्रचि १६

(उन्हाळ्यातही पाणी टिकवून धरणारी नदी.. पावसात माका या अँगलने फोटो काढूचा तर होडीयेत बसूक लागात..)
प्रचि १७

(आटलेल्या नदीचे पात्र)
प्रचि १८

(वेळ सूर्यास्ताची.. मी तर तिन्ही दिवसांचे सूर्यास्त टिपण्याचे मनाशी पक्के केले होते..)
प्रचि १९

(नदी ओलांडूक होडीची गरज उन्हाळ्यात तरी नाही)
प्रचि २०

(सूर्य मावळलो आता गुरांका घेउन घरी जाउची वेळ.. )
प्रचि २१

(अंधार पडला म्हणान काय झाला.. कामं सुरूच रवतत)
प्रचि २२

(शेतातून आणलेल्या मिर्च्यांचे देठ कापण्याचा काम..)
प्रचि २३ कोकणमेवा -

माझा दुर्भाग्य असा की आंबे कच्चेच होते.. फणस, रतांबे, करंदा (करवंदा), जाम असा सगळा खाऊक गावला..
या भेटीत विविधरंगीपक्षी दिसले नाय तर नवलच.. भटकंती करताना त्यांका कॅमेर्‍यात टिपूचा म्हणजे मस्तच टाइमपास..स्मित
प्रचि २४

कोकणाता कितीही फिरला तरी कमीच.. नि खयपण गेला तरी मन रमतेच.. मगे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असो वा घराकडची नदी असो.. तेव्हा परतीच्या प्रवासाला निघूचा म्हणजे साहजिकच कठीण ! नि तुमचा मुक्काम जास्त दिवस असेल तर जीवाची जास्तच घालमेल !! त्यात निघताना सगळ्या थोर व्यक्तींचे आशिर्वाद घेउन निघताना घराकडच्या लोकांच्या पापण्या ओलावलेल्या.!.घरी पोचलस की लगेच फोन कर म्हणत निरोप देणारी मंडळी.. 'पुन्हा कधी येणार' म्हणत अगदी रस्त्यापर्यंत सोडूक येणारी बच्चाकंपनी.. खराच.. कठीण असतो तो प्रसंग.. गाडीत बसला की अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक चालू होतो.. नि मुंबई येउच नये असा वाटीत रवता.. बरा. मुंबईत पोहोचेस्तोवर मोबाईलवर दोन तीनदा फोन येउन जातो.. खय आसस ? पोचलास की नाय ? विचारपुस होतेच.. नि एकदा मुंबईत इला की गावच्या दौर्‍याचो कितीपण हँगओवर असांदे.. ऑफीस गाठावेच लागते.. स्मित

Wednesday, June 22, 2011

आता झालोय delete कायमचा

इथेच आहे ती आजुनही 
वाचतही आसेल कदाचित ,
............हो नक्कीच 

तासन तास good morning 
ते good night होईपर्यंत 

ऑफिसच्या कटकटी बॉसची मुजोरी
बॉयफ्रेंडचे रूसणे नंतर मस्का मारणे 
रागीट होती,चंचल होती 
फोटोतही सुन्दर दिसत होती 
हट्टी होती ,लहरी होती 
बोलबोल बोलायची ती 

ऐकायचो मी सारे काही 
confession box सारखा 
p c च्या पडदयाआडून 
हेलकावत रहायचो सारखा 

आता झालोय delete कायमचा 
का ते मलाही विचारायचे नाही 

आणि हो लहर आली ........
तरी पुन्हा " add " करायची गरज नाही !!!

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,
तेंव्हा आपण आपलेच राहिलेलो नसतो,
डोक्यात फक्त तिचाच विचार फिरत असतो,
अन डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा दिसत असतो,

आपल्या वागण्यात अचानक बदल घडतो,
गचाळपणा जावून टापटीप पणा येतो ,
दिवस-रात्र फक्त तिचाच विचार सुरु होतो,
अन आपल्याच जगात आपण रममाण होतो,

चोवीस तास मोबाईल कानालाच असतो,
मिनिटा-मिनिटाचा वृतांत प्राप्त होत असतो,
बाकी मित्र-मंडळीचा मग हळू-हळू विसर पडतो,
अन आई-वडिलांसाठी तर आपल्याकडे वेळच नसतो,

दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने,
काळ असाच पुढे सरकत असतो,
दोघांच्याही नात्यात दररोज,
नव-नवीन रंग भरत असतो,

हळू-हळू सुरु होतो मग रुसव्या-फुगव्यांचा लपंडाव,
कधी याच्यावर तर कधी तिच्यावर येत असतो डाव,
कारण दोघेही घेत असतात एकमेकांच्या हृदयाचा ठाव,
काहीच नाही झालं की शेवटी बोलतात, आता एवढाही खाऊ नकोस भाव,

अचानक एक दिवस अशी येते वेळ,
त्यावेळी सुरु होतो नियतीचा खेळ,
मग दोघांच्यातही रहात नाही कसलाच ताळ-मेळ,
अन अर्ध्यावर्तीच मोडून जातो त्यांच्या प्रेमाचा खेळ...

तुझ्याविना

तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि त्या नंतर मला या जगण्याचा..

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,

कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,

किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,

आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते ....

खरच मी चुकलो....!

"खरच मी चुकलो....?

तिच्या बरोबर काही पाउले चालताना,
आणि आमच्या नात्याची सांगड़ घालताना.
खरच मी चुकलो ?

वेड्या मनाला आवर घालताना,
आणि का कोण जाणे तिला नकळत जपताना.
खरच मी चुकलो ?

ढ़ासळनारा तो पत्त्यांचा बंगला बांधताना,
आणि दरवेळी शब्दाशब्दाने नविन डाव मांडताना.
खरच मी चुकलो ?

आयुष्याच्या पाना पानावरची कहानी तिला मनापासून सांगताना,
आणि जे नाही तिच्याकडे ते हट्ट करून मागताना.
खरच मी चुकलो ?

ती फक्त ती आहे म्हणून तिला विसरून तिच्याकडे तिच्यासारख बघताना,
आणि मी फक्त मी आहे म्हणून स्वतःला विसरून मुलासारख वागताना.
खरच मी चुकलो ?

माझ हरवलेले अस्तित्व तिच्यामधे शोधताना,
आणि भावनाशुन्य अमितच मन वेदनानी आक्रोशाने भरताना.
खरच मी चुकलो ?

तिच्यापासून दूर जाण्यासाठी आज थोड वेगळ वागताना,
आणि हे सर्व लिहून मनापासून तिची माफ़ी मागताना.
मी सांगतो,

खरच मी चुकलो....!"

तू कसं विसरु शकतेस?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?

आयुष्याचा प्रत्येक क्षण

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो
आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो
वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो

भरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूच
सुख देता देता दुःखच फक्त दिलेस तू
अश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतो
तरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतो

सुखाची तुझ्या भाषाच निराळी होती
पण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होती
मनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतो
आणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो

मुका मीच झालो

मुका मीच झालो, स्मरले न काही
विसरूनी जा तू, तुझा दोष नाही

माझा मीच कसा भांबावुन गेलो
ना कळाले मला ,तुझा दोष नाही

मानले ना तेव्हा डोळ्यांचे इशारे
वेड हे माझेच तुझा दोष नाही

प्रतिबिंबही न उमटले तुझ्या प्रीतीचे
आरसाच फुटका , तुझा दोष नाही

सुटले ना भान ,ना ढळलो जराही
विसरलीस तू , तुझा दोष नाही

मी तुला परका झालोय

बर झाल प्रेमाच्या बंधनातुन मुक्त केलस,
अस बंधन जे कधी तुटनार नाही वाटत होत,
बर झाल परक मला केलस,
कारण डोळ्यातील अश्रुंचा भाव मज कळला,
आंधळ्या प्रेमाच्या विश्वाचा अर्थ मला वळला,
......वाटत होत आयुष्यात कुणाची साथ हवी
पण अशी साथ दिलीस की कोणाचा विचार देखील मनात येणार नाही,
मीच दु:खी नाहीय,
तुही रडतेस,
आता तुझे अश्रु पुसण्याचा अधिकार मी गमावलोय,
माझ्याच चुकीने मी तुला परका झालोय

प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....

अश्रू ते लोचनी लपवतेस कशाला ?
सांग पापण्यांना फसवतेस कशाला ?

शब्द येता ओठी त्यास अडवतेस कशाला?
मग चावून अधराना दुखावतेस कशाला?

येता विचार मनी, दडवतेस कशाला?
देवूनी हुंदके मग रडतेस कशाला?

गर्दी भावनांची, तू झाकतेस कशाला
भाव विभोर चेहर्याला , असली शिक्षा कशाला

कशा कशाला तू फसवशील, रडवशील, झाकशील
आठवण येता त्याची राहवेल का त्या खळ्यांना

खुदकन हसून फोडतील सारे भांडे तुझे ...
प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....

एक थेंब तुझ्यासाठी

ये ना परतुन प्रिये.....

तुला पाहुनच मी जगतो
स्वप्नात तुला मी बघतो
तुझ्यासाठीच जीव तरमळतो
ये ना परतुन प्रिये.....


जीव झाला एकटा
साथ नाही कुणाचा
आवाज तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये....


आठव ते क्षण्
हातात हात घालुन फ़िरलेले
साद तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये.....


माझ्याविना जरी तु
सुखी असली तरी
कसा मी जगतोय पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.....


या वेड्या जीवाला
आस तुझीच आता
श्वास थांबण्याअगोदर
ये ना परतुन प्रिये....


सुरवात आपल्या प्रेमाची
आठवत तुला नसेल तर
शेवट माझा पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.......

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका... पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार करू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ कधी करू नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..प्रेम करतोय अस दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका...

काही तरी सांगावे....

हम्म... जरा नव्याने... खरच
नव्याने सुरुवात करावी म्हणतोय मी ....
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

ते पावसाचे रीमझीमणे
अन त्यातल्या कातरवेळीच्या आठवणी
पुन्हा एकदा ओठावर येतात
तीच ती विरहाचे गाणी......

रेशमी केसांच्या बटा
ती गालावरची खळी..
छ्या ... नको वाटतात
आता त्या आठवणी...

छळणाऱ्या या आठवणी
घर करून बसतात मनी...
कातरवेळ आली कि....
येतात फिरून माघारी...

शब्दातीत यांचे वर्णन...
करावे म्हणतोय मी...
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

अशीच ऐके दिवशी....

अशीच ऐके दिवशी तू विचार करत बसशील.................,

जवळ कुणीच नसेल तेंव्हा माझीच आठवण काढशील................

पण वेळ निघून गेलेली असेल, 
 
परतीच्या पाऊल खुणा तू स्वताच पुसून टाकलेल्या असशील........

एकत्र घालवलेला वेळ आठवण्याचा पुन्हा प्रयत्न करशील.............
 
आठवेलही तुला सर्व काही, 
 
पण गेलेली वेळ आणि ते क्षण पुन्हा परत कशी आणू शकशील...?

सवय अजूनही आहे.....

तू निघून गेल्यावर तुझी वाट पाहण्याची,
सवय अजूनही आहे......

बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे……!!!

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे…
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे……!!!

आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर.......

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही...

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..


डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..


दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही...

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ...

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात  नाही ...

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत  नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ...

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ...

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,
संपण्यासाठीच हे सर्व,
आणि उरण्यासाठी काहीच नाही ....
काहीच नाही ......

खास तिच्यासाठी........

तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
तू गेल्यावर एकटा एकटा खूप रडलोय,अजूनही रडतो.
कधी ऑफिस मध्ये जाताना रस्त्यात,कधी ऑफिसमध्ये विचार करताना,
कधी रात्री आठवणी काढताना,कधी एखादे गाणे ऐकून, तर कधी रस्त्या वरची इतर कपल बघून.
एक एक शब्द आठवतो तुझा,आताही लिहिताना डोळ्यात पाणी आहेच......
त्या पाण्याचे वाईट वाटत नाही पण माज्या रडल्याने तुला काहीच फरक पडत नाही ह्या विचारानेच जीव जातोय.
गुदमरतोय जीव माझा.जाऊन कुठे तरी जोरात किंचाळावेसे वाटतंय.
रड रड रडावेसे वाटतंय.सगळे जड जड झालंय.
कधी कधी वाटते कि तू असे केलेस त्यात तुजी काहीच चूक नाही आहे,मीच वाईट असणार.....
पण इतका पण वाईट वागलो नसेन ना मी तुज्याशी?
एकदा पण विचार नाही केलास नाहीस ना माझा????
त्या समुद्र किनार्या वर कधी जाऊ नकोस,
कारण माझ्या पेक्षा तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
....
..
अगं आता नाही करत पण एका क्षणासाठी का होईना कधी तरी प्रेम केले होतेस ना माझ्यावर?
विश्वास उडत चाललाय सगळ्या वरचा
खूप काही बोलायचेय.....
खूप प्रश्न विचारायचेय्त......विचाराय्चेय कि का वागलीस अशी माझ्याशी?
पण माझ्या बोलण्यात आता तुला इंटरेस्ट नसेल आणि
माझ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस तर ती ऐकण्याची माजी हिम्मत नाही आहे
पण
आता
इतका राग नाही राहिलाय
उलट अजून प्रेम वाढलय
असेच वाढू दे अशी इच्छां आहे......
अजून हि खूप प्रेम करतो तुज्यावर
तू नको करूस कधी पण मी करेन नेहमी
....
....
....
जिथे पण जाशील,ज्याच्या बरोबर राहशील खुश रहा.....
दुसरे कोणी नाही तर एक कोणी तरी आहे तुज्यासाठी देवाकडे मागणारा...
कधी तरी खूप रडावेसे वाटेल......
अगदी खुप..
तेव्हा आठवण येईल माझी.....
खुश रहां


Friendship Day...

Friendship Day ला,कोणी मित्त्रच जवळ नव्हता,
म्हणून मग विचार केला, आपण पड्लेलोच आहोत एकटे,
तर मग कशाला हवे आपल्यासोबत कोणी दुसरे,

दुपार पर्यंत राहिलो कसातरी, 
थोड्यावेळासाठी वाटले, 
आपली जवळची व्यक्तीच नाही आपल्यासोबत,
तर लांबचे मित्त्र काय येणार?

मनात आशा होत की तुझा फोन येईल, पण तो काही आलाच नाही,
शेवटी मग तुझ्या आठवणी घेऊन ५ वाजता पडलो घराच्या बाहेर,

जाऊन जाऊन जाणार तरी कुठे म्हणून मग तिथेच गेलो,
जिथे आपण दोघे नेहमी जायचो, त्याच garden मध्ये...
ज्या जागेवर आपण दोघे बसायचो तिथे मी काल एकटाच बसलेलो,
3 couples आले होते तिथे, त्यांना पाहून मला जरा वाईट वाटले,
कारण मी काल एकटाच होतो ना.....!

खूप आठवण येत होती काल तुझी, 
त्यामुळे अश्रू काही थांबायला मागत नव्हते ...
तू अशी अचानक सोडून जाशील ह्या अमित ला असं कधी वाटलं नव्हत,
कदाचित माझीच काहीतरी चूक झाली असावी ह्या मागे असाच मला आजूनही वाटतय,

तू पुन्हा माझ्याचकडे येशील ह्याची खात्री आहे मला, 
पण तो पर्यंत बोलना सोडून दिलंयस ह्याच थोड दुःख होतंय मला....

तुझी आठवण खूप सतावते आहे ग सोनू, 
please एखादा Call कर ना मला...

बोलतात ना १०० चांगल्या गोष्टीतून एखादी चुकीची गोष्ट केली की ती दिसून येत नाही,
तसाच आठवड्यातून एखादा call केलास तरी कुणाला काहीच कळणार नाही,

तुझ्यासाठी नाही तर ह्या सुहास साठी तरी......Please........
 

कदाचित तुला माझी आठवण येईल

खिडकीत जेव्हा उभी तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ 
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही त्याच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
त्याच्या निथळत्या केसांमधून 
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल 
पावलांना तुझ्या स्पर्श होता, 
तो असल्याचा भास होईल 
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !

ती म्हणायची.........

डोळ्यांत तुझ्या पाहिलं की......
आरश्यात पहावसच वाटत नाही.......
हृदयात तुझ्या राहते मी.......
आत्ता घरी रहावसच वाटत नाही.......!!

गालावरची खळी पाहिली की......
हसू थांबावच वाटत नाही.......
खुप आनंदी असलास की.......
आनंद ओसरावाच वाटत नाही.......!!

जवळ असलास माझ्या की.......
तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर......
माझं प्रेम आटावसच वाटत नाही.......!!

तुझी आठवण येणार नाही.......
असा दिवस यावासाच वाटत नाही......
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न.......
स्वप्न तूटावसच वाटत नाही......

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस

तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

बरंच काही निघून गेलयं तरीही मी उभाच आहे,
अर्थ सर्वच संपून गेलाय तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता श्रावणानंतर होत तसं

तरीही,

तरीही बरंच काही शिल्लक आहे अजून माझ्या हाती,
काही शण अजूनही आहेत फक्त माझ्यासाठी...

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही 

तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय......

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ,
मी तर वेडा झालोच आहे तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.


जशी तू सामावली आहेस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला 
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स

माझ्या ......... साठी माझी शेवटची कविता......

सारं आठवतय.......
आपल्या नेहमीच्या बाकावर बसणं
तिथे खांद्यवर डोकं ठेवून एकमेकांत रमून जाणं
"देशील ना मला साथ म्हणून" 
माझ नेहमीचं विचारणं...
तुझे ही मला हसत हसत उत्तर देण..
नाही जाणार सोन्या तुला कधी सोडून...
सारं आठवतय..........

असच सगळं अलबेल चालू असताना..
एकेदिवशी तुझा मला फोन येन,
आणि मला बोलणं, माझा विषय दे सोडून,
नंतर मी तुला शेवटच भेटायला बोलावणं
तुझ ते वागण पाहून सगळं मला समजणं
तरीही मी तुला विचारणं
त्यावर जा मला विसरून असं म्हणून
तुझं ताडकन निघून जाणं
सारं आठवतय.........

तू जात असताना 
तुझा हात रिक्षात मी घट्ट पकडून ठेवण 
माझं तुला डोळे भरून पाहणं
त्या मध्येही डोळ्यात पाणी येणं
तुझं साधं मागे वळूनही न पाहणं
सारं आठवतय
सारं आठवतय................ 

त्याच आठवणी घेऊन मला आता संपूर्ण आयुष्य काढायचंय,
तुझ्या आठवणीत आता मला माझ्या सोबत ठेऊन जगायचं.......

तू तर जीव घेऊन निघून गेलीस...
तरीही आज जीव जळतोय.....
तू परत येण्याची आस आजूनही मनात आहे,
म्हणूनच मी आता जगतोय....