Wednesday, October 8, 2014

Monday, May 26, 2014

ती"च्या साठीच्या प्रेमाशिवाय

कधीतरी वाटते...
"ती"च्या समोर जाऊन फक्त उभे राहावे
मी आल्याचे तिला वर न पाहताच कळावे
शब्द नाही बोलू शकले ते, केवळ माझ्या सहवासाने व्यक्त व्हावे...


कधीतरी वाटते...
"ती"च्या बोलक्या डोळ्यात एकदाच प्रेमाने पहावे
"ती"च्या साठीच्या प्रेमाशिवाय "ति"ला त्यात काहीच न दिसावे
शब्द नाही बोलू शकले ते, नज्रेच्या त्या एका कटाक्षाने व्यक्त व्हावे...


कधीतरी वाटते...
कारण नसताना "ती"चा हात हातात घेऊन पाहावा
आयुष्यभर विनाकारण हात धरण्याची ती रंगीत तालीम असावी
शब्द नाही बोलू शकले ते, केवळ त्या हाताच्या स्पर्शाने व्यक्त व्हावे...

कधीतरी वाटते...
"ती"ला एकदाच घट्ट मिठीत घ्यावे
त्या आलीन्ग्नाने "ती"लाही मोहरून यावे
शब्द नाही बोलू शकले, ते हृदयातील स्पन्दनानी व्यक्त व्हावे...


कधीतरी वाटते...
"ती"ने नकळतच माझ्या खांद्यावर डोके ठेवावे
माझेही हाथ आपसूकच तिच्या केसात गुंतावे
शब्द नाही बोलू शकले, ते ह्या नकळत होणाऱ्या कृतीतून व्यक्त व्हावे...

काही माणसं..... आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात....

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात


मंजेच सिद्धेश आणि पूजा सारखी

 

आयुष्यात मैत्री ही हवीच

 

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही
नाती नाही तुटत

एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या
पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त
नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या
नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
 
सुहास पवार.........

तुला बघितल्यापासून..............


तुझ्या निखळ सौंदर्याकडे
बघून सुंदरताही लाजलीयं.
तुझे हास्य ऐकून,
खुद्द हास्यही हिरमुसलयं.

त्या खळखळणा-या निरझराने,
तुझीचं प्रेरणा घेतलीयं.
वेणूंच्या सप्तसुरांनीही,
तुलाचं साद घातलीयं.


तुला बघितल्यापासून,
माझे शब्दचं हरवलेत.
पण माझ्या ह्रदयाचे गीत,
माझे ओठ गुणगुणतं आहेत.

तुझ्या प्रेमाने माझ्यावर,
एक वेगळीचं जादू केलीयं.
देवाकडे काय मागू तूला,
तो स्वतःचं माझ्याकडे तुला मागायला आलायं.

Sunday, May 25, 2014

तुझ्या गालावरची खळी....

चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी,
आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी,
प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
 
ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे,
पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे,
मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायची
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
 
ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं..
माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं,
किती नाही म्हंटल तरी आपसूक नजर वळायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
 
माझ्या स्वप्नातली तू आजही तशीच आहेस...
शेवटच चॉकलेट मनात आजही जपल आहे,
माहित आहे मला आता नाही वाट पाहायची,
कारण ती खळी आता पुन्हा नाही दिसायची,
जी मला रोज रोज तुझ्या प्रेमात पाडायची....
तुझ्या गालावरची खळी....
 
 

तु भेटशील तेव्हा

तु भेटशील तेव्हा खुप काहि बोलायचे आहे थोडे फार भांडण आणि खुपसे प्रेम करायचे आहे, मनी साठवलेल्या क्षणांचा पदर उलगडायचा आहे प्रत्येक विरहाचा तुला जाब विचारायचा आहेँ, पण हे सारे ... तू भेटशील तेव्हा? सध्या तरी तुझी वाट बघणे हा एकच छंद जीवाला जडला आहे.....