Thursday, November 17, 2011

जेव्हा मी मरेन

सुहास पवार
जेव्हा मी मरेन, तू आश्रू वाहशील
पण मला कळणार नाही, म्हणून आता वाहूदे तुझे आश्रू माझ्यासाठी

जेव्हा मी मरेन, तू फुले वाहशील
पण मला दिसणार नाही, म्हणून आता पाठव फुले माझ्यासाठी

जेव्हा मी मरेन, तू माझी स्तुती करशील पण मी ऐकू शकणार नाही, म्हणून आता दोन शब्द स्तुतीचे बोल माझ्यासाठी

जेव्हा मी मरेन, तू माझ्या चुका विसरशील
पण मला कळणार नाही, म्हणून आता विसर त्यांना माझ्यासाठी 
  ♥ Live life today ..... Kya pata Kal Ho na Ho !!! ♥
 
 

Wednesday, November 16, 2011

का तीने मैत्री केली..

का तीने मैत्री केली..
ती वादळा सारखी आली..
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी का..?
का तीने मैत्री केली..
तीचे येनं मला कळले नाही..
तीचं जानं मला कळले नाही..
शुद्धीवर आलो तेव्हा कळले..
माझ्याकडे काहीच उरले नाही..
तीच्या साठी झुरायचं..
तीच्या साठी मरायचं..
का असं होतंय..
शेवटी आपणचं आपलं उरायचं..
तीच्या साठी पाहिलेले स्वप्न..
तीच्यावर ठेवलेला विश्वास..
ती सहज तोडून गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी..?
का तीने मैत्री केली..

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

... ... आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हेसुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातलेतारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्यतेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

माझा एकांत आणि मी

आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
... तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो...
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
... तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो...
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..

तर कदाचीत कधी...

'' सखे तुझी आठवण अश्रु आणतात ''
वेदना फक्त ह्रृदयाचा आधार
घेऊन सामावल्या असत्या

तर कदाचीत कधी
ङोळेभरून येण्याची वेळ
... आलीच नसती

शब्दांचा आधार घेऊन जर
दूखः व्यक्त करता आले असते

तर कदाचीत कधी "अश्रूंची"
गरज भासलीच नसती

'' सखे तुझी आठवण अश्रु आणतात ''

तुही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं,

स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त

माझंच स्वप्न पडावं,
...
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं,

तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप खूप रडावं. ♥

कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तुला ते अर्धवटच वाटावं.. ♥

मरणही असं..... तुज्या मिठीत यावं,
कि मरणानंतर हि ते मरण मला याद रहावं,
सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं,
कि दु:खाला पण माज्या आयुष्यात येताना कोडं पडावं.

Tuesday, November 15, 2011

तुझ्या मैत्री खातर........

हाकेला तुझ्या मी साद देईन,
मैत्रीला आपल्या आवाज देईन,
असलो सात समुद्र पार तरीही,
आपल्या मैत्रीसाठी मी धावत येईन...
आणि...
आणि जर असलो त्या देवा कडे,
तर मित्र,
तुझ्या मैत्री खातर ,
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
मी त्या देवाशी हि भांडून येईन...

क्षणभर विश्रांती

छोट्या छोट्या गोष्टीतून
आयुष्य घडत असतं
अनेक आठवणींच्या मृगजळात
मन अडकून बसतं

क्षणभर विश्रांती चाचपताना
थोडीशी धाप लागते खरी...
पण... अनंताचा उगम शोधणाऱ्याला
मिळेल तरी कसा श्री हरी...??

सरळ साधा सोप्पा प्रश्न
सतत सतावत असतो
बऱ्याचदा पंचांग चाळूनही
ज्योतिष स्वतःचा भाग्योदय का चुकतो..??

देव म्हणजे नक्की असतं काय..??
स्वतः मधल्या विश्वासच मूर्त असं रूप
कि ....असं अजाणत कोडं
ज्याची उकल आहे कठीण खूप

फरक फरक तो काय म्हणायचा,
जाळण्यात आणि पुरण्यात
दोन्ही वेळी थांबतो तो श्वासच
ईश्वर तोलतो फक्त पाप आणि पुण्यात

माणूस म्हणून जन्मलो
त्यात काय मोठेपण
माणुसकी धरून वागलो
कमावले देवपण

हरिनामाच्या चिपळ्या बरोबर
स्वकर्तुत्वाचा गजर करायला हवं
ज्ञानेश्वरांनी ही भोगलं सार..
तिथे आपल्यालाही थोड धीर धरायला हवं

खड्डयात पडण काही गैर नव्हत
फक्त.... निर्धाराने फक्त उभं रहायची जिद्द हवी
रस्ता तर ठेचाळणारा असणारच
पण... पहिलं पाऊल टाकायची उमेद हरलेल्या मनात हवी

सुहास पवार.......

आज मी तिला,
माझ्या facebook account मधून unfriend केले...

आठवणींना तिझ्या,
मनी कुठे तरी save केले...

रडू लागले जेव्हा,
कधी हे मन माझे...
त्या आठवणीन वर double click करून,
मी फक्त त्यांना play केले ...

अन,
रडून झाल्यावर,
शांत पणे मी डोळे मिटले...

पुडे काय करेन,
ते मला माहित नाही...

पण,
आजवर तर मी हेच केले....
आजवर तर मी हेच केले....

...सुहास पवार.......

break up नंतर,
मी घेतलेला सगळ्या चुकीचा निर्णय हा होता....

कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये.

कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडताना असहय यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येउ नये
की पानाना ते नाव जड जावे
एक िदवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे

कुणाला इतकाही वळे देउ नये
की आपल्या क्श्णाक्शणावर त्याचा हक्क असावा
एक दिवस आरश्यासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाचे इतकेही ऐकु नये
की कानात फ़क्त त्याचेच शब्द घुमावेत
आपल्या ओठातुनही मग
त्याच्याच शब्दान्च उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रत्येक स्पनदनात ती जाणववी
ती साथ गमावण्याच्या भीतीने
डो्ळयात खळकन अश्रु जमावी

कुणाला इतकाही माज़ा म्हणु नये
की त्याचे 'मी पण' आपण वीसरुन जावे
त्या सम्भ्रमतुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्याही दुर जाउ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे
दूर दूर आवाज िदला तरी
आपले शब्द जगीच घुमावे .............!

माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला..........
जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला.........
जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला.........
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला......

माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे

एवढे एक करशील ना ? शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ? माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ? ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ? आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ? चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ? कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ? मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ? जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ? तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी.......... तूच एक असशील ना ?

जेव्हा तू पण कुणाच्या खऱ्या प्रेमात पडशील...

""माझे खरे प्रेम तिला कधी कळलेच नाही"" !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,
न चुकता तुझ्यासाठी काहीतरी मागत असतो,
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून स्वतः साठीपण मागत जा,
त्याला म्हटले तीच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का रे?
मला झोपायला जमीन दिलीस तरी चालेल .... पण तीला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल ... पण तीला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तीच्यासाठी ... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ... पण तीला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ... पण तीच्या हृदयात माझे स्थान असच ठेव,
माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पाणावला,
का करतोस इतके प्रेम तीच्यावर जीने प्रेम तुझे स्वीकारले नाही,
का मरतोस तीच्यासाठी जीने जगणे तुझे मान्य केले नाही.
मी म्हटलो सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील ,
जेव्हा तू पण कुणाच्या खऱ्या प्रेमात पडशील... "

तुजविना मी कसा जगणार ?

बंध आहेत हे प्रेमाचे
तोडता नाही तुटणार
नाही तुटणार ही प्रेमाची नाती
आठवणीचे वारे ही वाहणार
सांग तुच आता
एकमेँकाशिवाय आपण कसे जगणार
कोमल अशा तुझ्या कळीला
कधीच नाही कोमजु देणार
अश्रुंशी नाते जोडलेस तरी
अश्रुंसाठी तुला पारखे करणार
करु शकलो नाही असे तर सांग तुच
एकमेँकाशिवाय आपण कसे जगणार
जरी वाळवंटात सापडलीस तु
मी तुझ्या सोबतीला असणार
शब्दात माझ्या अडकलीश तु
तर वेदना ह्या मलाच होणार
असं असताना तुच सांग
एकमेंकाशिवाय आपण कसे जगणार
का बंध टाकु मी माझ्या जीवनावर
मी यात वाहवतच जाणार
लढेन मी तुझ्या सुखासाठी
नाही लढलो तर मी या जगातच नसणार
कविता नाही हे जीवन आहे माझे
अखेरच्या श्वासापर्यत अंत नाही होऊ देणार
असं असताना तुच सांग
एकमेंकाशिवाय आपण कसे जगणार
तुजविना मी कसा जगणार ?

कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही

मला आठवतंय तुझ माझ्याशी बोलन
काय बोलतो तिथे लक्ष न देता तुझ्यात गुंग होण
मला आठवतंयतुझ मला पागल म्हणन
मग मी खोट खोट तुझ्यावर रागवण
मला आठवतंय तुझ मला लाडान बोलन
हे ऐकताना नव्यान तुझ्या प्रेमात पडण
मला आठवतंय तुझ माझ्यावर प्रेम करण
प्रत्येक वेळेस माझ त्या प्रेमास जगन
मला आठवतंय तुझ माझ्यावरच चिडण
तुझा राग जावा म्हणून माझा हि धड्पद्न
मला आठवतंय तुझ मला टाळण
अस वागताना तुझ .माझ वेड्यागत होण
मला आठवतंय माझ्यावर प्रेम नाही अस तुझ बोलन
अन माझ ते कठोर मनान स्विकारण
मला आठवतंय तुझ माझ्याशी खर बोलन
म्हणून तर तुझ्यावरच माझ प्रेम पुन्हा पुन्हा गाढ होण
मला आठवतंय तुझ्याशी बोलण्यासाठी
माझ तडपण.नेमक तुला त्या गोष्टीचा त्रास होण
मला आठवतंय तुझ्या सोबतच चा प्रत्येक क्षण
अन फक्त तुझ्यात .गुंतलेल ते माझ मन
पण.......
तुला आठवत का रेमाझ तुझ्यासाठीच जगन
कुठलीही अपेक्षा न करता फक्त तुझी वाट बघन
तुला आठवत का रे एकदा तरी तुझ मला आठवण
मी काढलेल्या आठवणी मुळे सतत तुला उचकीच लागण
मला सार आठवत पण तुला आठवत कि नाही माहित नाही
कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही
कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही ..!!!!!

I Miss you"

कोणत्याही अडचणीच्या वेळेला, मी म्हणणार नाही तुला see you
नेहमी राहुयात एकत्र, Me & you
जर उद्या मी ह्या जगात नसेन, तर ठेवून फुल माझ्या प्रेतावर
फक्त एकदा म्हण Stupid I Miss you" ♥

तू येशील

कॉलेज मध्ये असताना गुलाबाचं फुल तू झाडावरून तोडलंस पण ते कुठेच न वापरता पुस्तका मध्ये ठेवून दिलंस, पुढे ते फुल तसंच पुस्तकामध्ये राहून गेलं ...........
त्याचवेळी माझ हृदय पण तू तोडलंस, ........... आणि ते देखील कुठेही न वापरता असंच पडून राहिलं ..... !!! :(
आज, वर्षानुवर्षे पुस्तकामध्ये ठेवलेला पण सुकून व कोमेजून गेलेला तो "गुलाब आणि मी" ह्यांमध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये ................. आमच्या दोघांमधला सुगंध आता निघून गेला आहे पण दोघांच आस्तित्व मात्र अजूनही तुझ्या आयुष्यात एकाच छोट्या अपेक्षेने असंच पडून राहिलं आहे .......... तू येशील आणि पुस्तकाची (आयुष्याची) पाने चाळून बघशील !!!

Tuesday, November 8, 2011

जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात

रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,
न चुकता तुझ्यासाठी काहीतरी मागत असतो,
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून स्वतासाठीपण मागत जा रे,
त्याला म्हटले तिच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का रे?

मला झोपायला जमीन दिलीस तरी चालेल .... पण तिला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल ... पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी ... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ... पण तिला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ... पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,

माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पानावला,
का करतोस इतके प्रेम तिच्यावर जिने प्रेम तुझे स्वीकारले नाही,




का मरतोय तिच्यासाठी जिने जगणे तुझे मान्य केले नाही,

मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील ,
जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील... "